महाराष्ट्र

पंचनामे झाले!कोकणवासिय मदतीपासून वंचित;

.२२ जून :-निसर्ग वादळानंतर कोकणवासियांच्या आयुष्यात अंधारमय झाले आहे. दोन आठवडे पूर्ण झाले असून आजही कोकणवासिय अनेक संकटाना तोंड देत दिवस काढत आहे.कुणाला राहण्यासाठी घर नाहीये तर कुणी नातेवाईंकाच्या व जिथे सोय होईल तिथे जाऊन सध्या राहत आहे.घरातील आवश्यक सामान निसर्ग वादळाने अस्थव्यस्थ झाल्याने कठीण संकटाना तोंड द्यावे लागत आहे.निसर्ग वादळाने नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे केली आहेत पण अद्याप मदत शासनाकडून न भेटल्याने संकटात सापडलेल्या कोकणवासियांच्याची लक्ष शासनाच्या मदतीकडे लागले आहे