महाराष्ट्र

होम क्वॉरन्टाईन व्यक्तीचा खून!

कोरोनाच्या महारीत माणसांचा स्वभाव हा विक्षिप्त होत चालला आहे.बारीक-सारीक कारणाने हत्येच्या,आत्महत्येच्या घटनाच सत्र सुरु झाल्याचे चित्र सद्य चांगलेच पाहायला मिळत आहे. होम क्वॉरन्टाईन असलेल्या व्यक्तीची जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तुळसवडे इथे घडली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधाजी तोसकर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांना भावाच्या कुटुंबातील पाच जणांनी मध्यरात्री काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये मंगेश तोसकर, मेघना मंगेश तोसकर, चंद्रभागा चंद्रकांत तोसकर, वैष्णवी विश्वास तोसकर आणि मीनाक्षी चंद्रकांत तोसकर यांची नावे देखील देखील समोर आली आहेत.