Popular News

कंगना तुलाही आत्महत्या करावी लागले -जावेद अख्तर

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतने हिंदी चित्रपट सृष्टीमधील वास्तववादी चित्र मीडियासमोर आणण्यास सुरवात केली आहे.हिंदी चित्रपट सृष्टीतील घराणेशाहीचा दबदबा कशाप्रकारे नवोदित कलाकारांवर आहे हे कंगनाच्या बोलण्यातून दिसून येत आहे.अशातच मीडियाशी बोलताना
कंगना म्हणाली की,

“एक दिवस जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं आणि मी राकेश रोशन,हृतिक रोशन यांच्यापासून दूर राहावं असं समजावलं. राकेश आणि त्यांचं कुटुंब हे मोठे लोक आहेत. जर तू त्यांची माफी मागितली नाही तर तुला बॉलिवूडमध्ये अडचणी येतील. ते लोक तुला जेलमध्ये पाठवतील. तू उद्ध्वस्त होशील. मरण्याशिवाय दुसरा पर्याय तुझ्याकडे नसेल. आणि तुला तुला मजबुरीने एक दिवस आत्महत्या करावी लागले असं जावेद अख्तर मला बोलले होते.कंगनाच्या या बोलण्यातून आढावा घ्यायचा म्हणलं तर नक्कीच एका गोष्टीचा सुगावा लागतोय कि कुठेतरी बड्या स्टार्स मुळेच सुशांतच्या आयुष्यात नैराश्य आले होते.आणि या नैराश्यास वैतागूनच सुशांतने जीवनयात्रा संपवणे योग्य समजले.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड