महाराष्ट्र

राज्यात आज रुग्णवाढीचा नवा उच्चांक!

19 जून : कोरोनाचा कहर राज्यात कायम आहे.प्रशासन,आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतरही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा दावा सरकारने कालच केला. पण तरीही दररोज नव्या रुग्णांचा उच्चांकी आकडा समोर येतोच आहे. आज दिवसभरात 3827 रुग्ण वाढले. कालचा आकडा 3752 होता. आज दिवसभरात कोरोनामुळे 142 मृत्यूदेखील झाले आहेत. त्यात सर्वाधिक मृत्यू मुंबईतले आहेत.आज आज दिवसभरात 1935 रुग्नांना कोरोनमुक्तीची पावती भेटली आहे. कोरोनमुक्त होणाऱ्यांची वाढती संख्या ही दिलासादायक आहे. तरीही राज्याचा मृत्यूदर देशाच्या सरासरीच्या तुलनेत अधिक असल्याने हा चिंतेचा विषय आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड