महाराष्ट्र

उपचाराअभावी दोन रुग्णांचा मृत्यु!

कोरोना थैमानाने त्रस्त असणाऱ्या निष्पाप लोकांचा दिवसेंदिवस मृत्यु होत आहे.कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाच्या नाकी नऊ आले असून रुग्णांना सर्वत्र परिपूर्ण सेवा देण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका कोरोनाच्या विरोधात सज्ज असल्याचा दावा करत आहे.मात्र कल्याणमध्ये दोन रुग्णांचा उपचाराअभावी रुग्णालयासमोरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाला उपचारासाठी बेड मिळाला नाही तर दुसऱ्याला वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड