Popular News

गोविंदाचा गौप्यस्फोट!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरण नंतर बॉलीवुड दुनियातला बनावटी मुखवटा खाली पडून बॉलीवुडमधील वास्तविक चित्र समोर येऊ लागले आहे.प्रत्येकाने बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या घराणेशाहीवर स्वतःच्या अनुभवाचे परखड मत मांडले आहे.ज्यात अनेकांनी सलमान खान, यशराज बॅनर आणि करण जोहर यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणलं कि प्रत्येकाच्या ओठांवर गोविंदाचा नाव पटकन येतं. अभिनय, स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने जीवावर गोविंदाने रुपेरी पडद्यावर धमाल उडवली. 80 आणि 90 च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत धमाल उडवणाऱ्या आणि रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या गोविन्दाने मोठा गौप्यस्फोट केला आहे.पत्रकार परिषदेत त्याने बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या घराणेशाहीवर परखड मत मांडले आहे.
गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले की… ‘मी सलमानबरोबर ‘पार्टनर’ सिनेमामध्ये काम केले होते, त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याला सांगितले की तु गोविंदा बरोबर काम करू नको, तुला मोठा प्रोब्लेम होईल.’ इंडस्ट्रीमध्ये एक जेलस फॅक्टर आहे. जितके माझे कौतुक केले गेले तेवढे मी इंडस्ट्रीतून दूर फेकला जाणार आणि माझ्याबरोबरही तेच घडले बॉलिवूडपासून कधी दूर झालो हे माझेच मला कळाले नाही असे गांविदाने सांगितले.जिथे सलमान शाहरूख यांचे सिनेमे हिट ठरतात.तिथे गोविंदाला एकही सिनेमा मिळू नये ही हैराण करणारी गोष्ट असल्याचे त्याने म्हटले होते. गेल्या १० वर्षापासून गोविंदाला एकही सिनेमाची ऑफर मिळाली नाही. यावर त्याने सांगितले की, देवाची कृपा आहे की,माझा घरखर्च हा सिनेमावर अवलंबून नाही.असे राहिले असते तर माझी काय अवस्था झाली असती याचा विचारही करवत नाही.नक्कीच सलमान खान,कारण जोहर सारख्या बड्या स्टारमुळे स्ट्रगलर लोकांना त्रास होतो आहे सुशांतही त्यातलंच एक उदाहरण आहे.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड