महाराष्ट्र

कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करुन घेऊ नये : राजेश टोपे

मुंबई : राज्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांना बेड्सची कमतरता पडत आहे. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्णही रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात भरती होत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्यात. रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
ज्या पॉझिटिव्ह रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. कोरोनाचा थेट रिपोर्ट रुग्णांना दिला तर कोणतीही लक्षणे नसलेले लोक तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात जाऊन दाखल होतो. त्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज असणाऱ्या रुग्णांना जागा मिळत नाहीत. खासगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे, त्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे टोप यांनी सांगितले. सगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे विशेष अधिकारी नेमण्यात आले आहे.
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड