बीड

अखेर मृत्यूशी झुंज अपयशी; कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

21 Sept :- श्रीवास्तव राजू श्रीवास्तव यांची अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 42 दिवस ते कोमात होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळगावी कानपूरमध्ये नव्हे तर दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या साऊथ एक्स येथील कल्ट जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.