महाराष्ट्र

बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती हे या सभेतील गर्दीने दाखवून दिले- मुख्यमंत्री शिंदे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Sept :- बाळासाहेबाची खरी शिवसेना कोणती या प्रश्नाचे उत्तर आजच्या सभेतील गर्दीने दिले आहे. कुणी जबरदस्ती पैसे देऊन येथे आले नाही. प्रेमाने येथे सभेसाठी हे लोक येथे आले आहेत असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन ठाकरे गटावर केला. ते पैठणमध्ये सभेत संबोधन करीत आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो.

मुख्यमंत्री म्हणाले, पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रीया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो.

मुख्यमंत्री म्हणाले, चांगले काम आपल्याला करायचे आहे. एवढेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी मला शिकवले. सर्व आपली माणसे सभेत आहेत. ते आपल्या प्रेमापोटी येतात. काही सभा मी पाहिल्या. राष्ट्रवादीचे लोक काही सभेत पाठवले जातात. आमची गर्दी तशी नाही. विरोधकांच्या शब्दकोशात फक्त खोके हेच शब्द आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, जे कधी करायला नको होते ते त्यांनी केले. त्यांच्या खोक्यांचा हिशोब मी आज काढत नाही. मतदार आणि हिंदुत्वाशी प्रतारणा, विश्वासघात कोणी केला हे त्यांना माहित आहे. हे राज्य सामान्यांचे आहे. या राज्यात सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत.