महाराष्ट्र

नितेश राणेंवर भास्कर जाधव संतापले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Aug :- आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी घोषणांच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवशीही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते भाजपाचे आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या झालेल्या शाब्दिक वादाने. प्रश्नोत्तराच्या तासात मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना जाधवांनी चांगलंचं धारेवर धरलं.

रवींद्र चव्हाण आणि सुनील प्रभू यांच्या प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. भास्कर जाधव आपले मुद्दे मांडत होते. मात्र. नितेश राणे मध्येच भास्कर जाधवांना टोकताना दिसले. त्यामुळे मध्ये मध्ये बोलणाऱ्या नितेश राणे यांना काहीतरी शिकवा, अशी विनंती जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.

“मी प्रश्न विचारून थकलो आहे. तुमचे अधिकारी मात्र तेच तेच उत्तर देतात, असा टोला जाधव यांनी राज्य सरकारला लगावला. २०२३ हा आकडा कायम आहे, परशूराम घाटाचा विषय कायम आहे, लोकांच्या कोर्ट कचेरीचा प्रश्न आहे. कोर्ट कचेरी पनवेल ते इंदापूर थोडीशी आहे, बाकी कुठे नाही, असे आपले मुद्दे मांडत असताना मध्येच नितेश राणे बोलले. त्यावर मला तुम्हाला विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. मी सरकारला विचारतो”, असे भास्कर जाधव म्हणाले.