महाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळेच शिवसेना संपली; संदीपान भुमरेंचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 July :- उद्धव ठाकरे यांच्या वागण्यामुळेच शिवसेना संपली आहे, असा आरोप पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचा मुखपत्र सामनाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

या टीकेला उत्तर देत संदीपान भुमरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांती मुलाखत मी पाहिली नाही, मात्र एकच सांगतो आम्ही वारंवार सांगितले की सत्तेतून बाहेर पडूयात, मात्र उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकले नाही. त्यामुळे आम्ही उठाव केला. नाहीतर शिवसेना संपली नसती असे देखील संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे. संदीपान भूमरे आणि रमेश बोरनारे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले आहेत, त्यापूर्वी भूमरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली. आम्ही अनेकदा उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडले पाहिजे, मात्र त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणून आम्हाला बाहेर पडावे लागले. म्हणून आम्ही बंड केले, नाहीतर शिवसेना संपली नसती, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.