महाराष्ट्र

तुम्ही माझ्याकडचे कितीही बाण न्या, धनुष्य माझ्याकडेच; ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 July :- शिवसेनेत फूट बंडखोरांनी नव्हे तर भाजपाने पाडली असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसोबत भाजपावरही टीकास्त्र सोडलं. तुम्ही माझ्याकडचे कितीही बाण न्या, धनुष्य माझ्याकडेच असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदरांसोबत भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपावर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेनेतील फुटीवर बंडखोर आमदार नव्हे, तर भाजपा असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की “भाजपाच शिवसेना संपवत आहे. भाजपा दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूर्ण होईल”. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून, सतर्क राहा अशी सूचना केली. तसंच माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या, पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे आहे असंही म्हटलं.