महाराष्ट्र

शिंदे टणाटण उड्या मारत पळत येतील; राऊतांचा घणाघात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Jun :- स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणणारे 24 तासांत गुवाहाटीला पळून गेले. ह्यांचे शरीर वाघाचे आहे, तर मन उदरांचे आहे. त्यामुळेच ते ईडीच्या कारवायांना घाबरून सगळे पळाले, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना केला. बंडखोर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला तर ते टणाटण उड्या मारत पळत येतील, असेही ते यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांनी एका मराठी न्यूज चॅनलला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, शिंदे मुख्यमंत्री न होण्यास केवळ भाजप जबाबदार आहे. 2019 मध्येच शिंदे मुख्यमंत्री झाले असते. मात्र, त्यांना भाजपने मुख्यमंत्री होऊ दिले नाही. दिल्लीत जाऊन केसेस निल केल्या जात आहेत. प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांचे नाव घेता राऊतांनी आरोपांच्या फटाक्यांची माळ फोडली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, गेली दीड वर्षे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे आणि हे केवळ एका कागदाला घाबरून पक्षाच्या विरोधात जात आहे. 50 कोटी रुपये देत आमदार विकत घेतले गेले. बंडखोरांनी हिंदुत्वाबाबत शिवसेनेला सांगू नये, असे म्हणत आनंद दिघे हे बाळासाहेबांचे हनुमान होते. मात्र, यांचे नाव घेऊन आता त्यांनी राजकारण करू नये, असा टोला राऊतांनी बंडखोर आमदारांना लगावला.

अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व दुरावले, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांची जुनी भाषणं ऐका. मात्र, कुत्रा सोडला तर कोणीही बेईमानी करू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपसोबत असतानाही शिंदेंच्या तक्रारी होत्या. मात्र मुख्यमंत्रिपद देतो म्हणालो, तर एकनाथ शिंदे उड्या मारत मारत येतील, असा दावा राऊत यांनी केला. शिवसैनिक सोडून गेल्याचे दु:ख आहेच. ठाकरेंच्या मनात शिंदेंचे मुख्यमंत्री होते. 24 तासांत सर्वांचे मंत्रिपद जातील. बंडखोरावर कारवाई होणारच आहे, शिंदेंनी आनंद दिंघेंचे नाव घेऊन राजकारण करू नये असेही संजय राऊत म्हणाले.