भारत

मोठी दुर्घटना : ढिगाऱ्याखाली दबून 12 कामगारांचा मृत्यू, 18 जखमी ;

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 :- मोरबी जिल्ह्यातील हलवाड येथे मीठ कारखान्याची भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. भिंत कोसळल्याने सुमारे 30 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने मृत व जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

हलवड येथील सागर सॉल्ट नावाच्या कारखान्यात भिंत कोसळली तेव्हा सुमारे 30 मजूर तेथे काम करत होते. त्यांच्यासोबत काही मजुरांची मुलेही होती, ती ढिगाऱ्याखाली आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

भिंत कोसळल्यानंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर स्थानिक आमदार परशोत्तम साबरिया हेही घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले. भिंत कशामुळे कोसळली हे अद्याप समजू शकलेले नाही.