महाराष्ट्र

छत्रपती संभाजीराजेंच्या २ मोठ्या घोषणा

12 May :- खा. छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकारपरिषदेत २ मोठ्या घोषणा केल्या आहेत त्या म्हणजे अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवणार आणि स्वराज्य नावाची संघटना स्थापन करणार. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संभाजी राजेंच्या भूमिकेचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होणार अश्या राजकीय चर्चेला वेग आला आहे. खासदारकीची मुदत संपल्यानंतर गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

खा. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, की आज मी दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय राज्यसभ्येच्या संदर्भातील आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिलं तर जुलैमध्ये 6 जागा रिक्त होत आहेत. यापूर्वी 3 जागा भाजप 1 जागा राष्ट्रवादी,1 सेना ,1 काँग्रेस अशी होती. आता समीकरण बदलले आहे. भाजपला दोन, काँग्रेसला 1, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागा, उरलेली 1 जागा आहे.

अपक्ष म्हणून सर्वांनी पाठिंबा द्यावा. जे छोटे मोठे पक्ष आहेत ज्यांना व्हीप नाही त्यांनी जाहीर भूमिका घेत मला समर्थन द्यावे. माझ्या कामाची दखल घेत आपण मला राज्यसभेत पाठवावे म्हणून मी सर्वपक्षांना विनंती करु इच्छितो. मी स्पष्टपणे सांगतो की, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाहीये.
छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, माझा दुसरा निर्णय 2007 पासून 2022 पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. मी शिव-शाहूंचा वंशज आहे. वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक मला पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. छत्रपती घराण्यांवर प्रेम करणाऱ्या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे.

त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी, अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी, शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे नाव जगभरात गाजवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे.

लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे. 2007 पासून 2022 पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले 5-6 दिवसच जातो. पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्त्वाची आहे.