महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या भाषणावर नाना पटोलेंचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 May :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. असह्य झालेली महागाई आणि बेरोजगारीवरुन लक्ष उडवून मोदी सरकारचं अपयश लपविण्यासाठी भाजपने राज ठाकरे यांना सुपारी दिली आहे. पण या सुपारीबाजाला जनता ओळखून आहे. त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर हल्लाबोल केला आहे. तसेच नाना पटोले यांनी सलग ट्विट करत भाजपवर हल्लाबोले केला आहे.

भाजप सरकारने अशी बरबादी पसरवली आहे की देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कमीत कमी बारा वर्षे लागतील. वीज, गॅस उत्पादन, पाणी पुरवठा, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, प्रसारणाशी संबंधित संवाद सेवा या क्षेत्रांची मोदी सरकारच्या काळात पार वाताहत झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.