महाराष्ट्र

महाविकास आघाडीची लंका जळणारच- भाजप नेते किरीट सोमय्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 April :- हनुमान चालिसेचा मुद्द्यांवरून राज्यभरातील वातावरण तापले आहे. आणि यावरुन आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी हनुमान हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचे दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचे म्हटले आहे. तर सोमय्यांनी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच असा निर्धारही हनुमान जयंतीच्या दिवशी व्यक्त केला आहे. यासोबतच राज्यातील मविआ सरकारच्या आजच्या विजयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मनसेनंतर आज भाजपकडून हनुमान चालिसा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यातच किरीट सोमय्यांनी विरोधकांची लंका जाळणारच असा दावा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

लोकांना संजय राऊतांचे हसू येत आहे किरीट सोमय्या म्हणाले की हनुमान जयंतीनिमित्त आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार आहे. महाविकास आघाडी सरकारचे 24 घोटाळे बाहेर काढले, यात नबाब मलिकांपासून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियापर्यंतचे सगळ्यांचा समावेश आहे.

गुरूवारीच मविआचा आणखी एक घोटाळा बाहेर काढला आहे. आता या माध्यमातून सरकारची नंका जाळणारच असा दावा सोमय्यांनी केला आहे. माझ्यावर राऊत आरोप करतांना दिसत असले तरी हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. एकदा 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि एक दिवस सामनातून 3 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे, ही संगळी नौटंकी राऊतांकडून सुरू आहे, यामुळे लोक त्यांच्यावर हसू लागले आहे, अशी टीका सोमय्यांनी केली आहे.