महाराष्ट्र

सोमय्या भविष्यात तुरुंगात जाणार; राऊतांचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 April :- टॉयलेट घोटाळा हा फक्त एक ट्रेलर आहे. मी टॉयलेट घोटाळ्याबाबत तक्रार दाखल करणार, हा घोटाळा खूप मोठा आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या जामीनावर सुटले आहेत, त्यांना उत्तर द्यावेच लागेच. कुणी बॉम्ब फोडतो कुणी देशाच्या अर्थव्यवस्थेची खेळतो लोकांना फसवतो हे देशद्रोहच आहे. किरीट सोमय्या भविष्यात जेलमध्ये जाणार असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपने किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून, ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, सोमय्यांनी विक्रांत घोटाळा करुन भाजपच्या तिजोरीत जमा केले, भविष्यात घोटाळेबाजांना तुरुगांत जावे लागणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सोमय्यांना तुरुंगात जावे लागणार, युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसे गोळा करणे हा गुन्हा आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र केले.पुढे संजय राऊत मनसेच्या भुमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये ओवैसींकडून जे काम भाजपने करुन घेतले, त्या पद्धतीचे काम महाराष्ट्रात भाजप मनसेकडून करुन घेत आहे.

पुढे राऊत म्हणाले की, आम्ही नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आम्ही कल्याण-डोबिंवली महानगर पालिका जिंकू, काल परवा ज्यांनी हिंदुत्व स्वीकारले असे ओवैसी महाराष्ट्रात चालणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना हीच खरी हिंदुचे रक्षक करते. असे म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.