महाराष्ट्र

नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; फडणवीसांची राऊतांवर टीका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 April :- आज भारतीय जनता पार्टीचा 42 वा स्थापना दिवस असून, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कायद्याने उत्तर द्या, भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. ईडीकडे काहीतरी पुरावा असेल, त्यामुळेच त्यांनी नोटीस आणि कारवाई केली असेल. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न आहे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला.

पुढे ते म्हणाले की, पत्राचाळ ही गरीब मराठी माणसांसाठी होती, मराठी माणसाला लुटणारे कोण आहेत, हे आता कळाले. पुढे फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची सी टीम म्हटले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

पुढे फडणवीस यांनी राजू शेट्टी यांच्यावर भाष्य केले, ते म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत गेल्याने राजू शेट्टींच्या विश्वार्हतेवर परिणाम झाला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला सोडण्याचा निर्णय घेतला, त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संपण्याच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.