महाराष्ट्र

बाळासाहेबांनी अनेकांना घडवले, पण हे कसे बिघडले?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 April :- राज ठाकरेंवर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर अगदी खालच्या शब्दांत टीका केली आहे. बाळासाहेबांनी अनेकांना घडवले, त्यांच्यामध्ये हे सुद्धा घडले होते. परंतु हे कसे काय बिघडले असा खोचक सवाल पेडणेकर यांनी केला आहे. यासाबतच बऱ्याच मनसेसैनिकांनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. असेही पेडणेकर म्हणाल्या.

दोन वर्षांपासून मोरी तुंबलेली होती, काही तरी बाहेर निघेल असे वाटले होते, पण तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडुळ बाहेर निघाले, अशी विषारी टीका पेडणेकर यांनी केली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन केले, येत्या काही काळात मेट्रोचे उद्घाटन करतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी बोलताना सर्व भाजपचे स्क्रिप्ट होते, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दलचा द्वेष यातून दिसून येत होता. यासाठीच राज ठाकरेंनी पक्ष सुरू केला की काय असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.