महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 March :- विधीमंडळ सभागृहात मुख्यमंत्र्यांची दोन भाषणे झाली. त्यांचे आजचे भाषण विधानभवनातील भाषण नव्हे, तर शिवाजी पार्कवरील भाषण होते. ते भ्रष्ट्राचारावर बोललेच नाही म्हणजे शिवसेनेची मतांसाठीची लाचारी दिसून आली. नवाब मलिकांचे समर्थन केले जात असेल तर या निमित्ताने बरे झाले मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आला. महाविकास आघाडी सरकार उघडे पडले अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी कोणत्याच प्रश्नांवर उत्तर देत नाही. शेतकऱ्यांच्या वीजबीलाचा प्रश्न असो की, सुरज जाधवची आत्महत्या तरीही ठाकरे सरकार बोलत नाही. शेतकरी, गरीब वर्ग, मजूर, यूवांसाठी कोणतीही योजना नाही. विदर्भ, मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड योजनेबद्दलही विचार नाही. पेशंट आयसीयूत आहे पण तो जीवंत असल्याचे भासवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

विदर्भ मराठवाड्यात तरतूदी दाखवायच्या पण खर्च करायचा नाही ही महाविकास आघाडीची मोड्स आहे. या अधिवेशनात कोणतेही ठोस निर्णय नाही. सरकारकडून दिलासा नाही, पेट्रोल डीझेलवर कर सरकारने कमी केला नाही. महाविकास आघाडी सरकार या मुद्द्यावर दुटप्पी आहे असेही ते म्हणाले.