महाराष्ट्र

राज ठाकरेंनी संजय उडवली संजय राऊतांची खिल्ली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 March :- ‘संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल हटले तर हे बंद. मग नंतर यांचे पुन्हा कसे काय सुरू, काय चाललंय’ असे म्हणज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. मनसेचा आज 16 वा वर्धापन दिन असून, पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पुण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे.

संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी रोज सकाळी पत्रकार परिषद घेत असतात, त्यावरुन राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “चॅनेल लागले तर हे सुरू, चॅनेल हटवले तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसे काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचे पडले आहे.” असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधक म्हणतात आम्हाला संपवायला निघाले. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे मनसेचे यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केले त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.” असे म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांचे कौतूक केले.