बीड

वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार? सदाभाऊ खोतांचा घणाघात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Feb :- पाच राज्यात सध्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष पायला भिंगरी बांधून प्रचारात उतरले आहेत. राज्यात भाजपचे सहयोगी असणारे सदाभाऊ खोत गोव्यातही भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात केला आहे. त्यांनी गोव्यात संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे. जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत गोव्यात बीजेपीची सत्ता येणार नाही असं म्हणणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे.

महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे. हा बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे, फक्त तोंडाची वाफ घालवण्याचं काम ते करत आहेत. त्यामुळे त्या माणसाला फार गणतीत धरणं आवश्यक नाही, असा हल्लाबोल त्यांनी राऊतांवर चढवला आहे.

शेजारच्या घरात पाळणा हल्लायला लागला की आपल्या हातात दोरी येईल असे यांना वाटतंय, पण असं होत नसतं, कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हलत असतो. यांच्याकडे पाळणा कसा हलेल वांझोट्या ना लेकरं बाळ होत नसतात, अशी घणाघाती टीका त्यांना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केली आहे. ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकासआघाडी गेली अडीच वर्षे केंद्राकडे बोट दाखवते आहे.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता दोन महिन्यात अहवाल कसा काय तयार झाला? याचा अर्थ राज्यातील ओबीसी आरक्षण घालवण्याचे काम या आघाडी सरकारने केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप हे महाविकास आघाडी सरकारचे होते हे आता सिद्ध झाले. वरातीमागून आता घोडं चाललंय त्यामुळे अनेक निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. आता तरी सरकारने सजग राहून न्यायालयामध्ये योग्य ती बाजू मांडावी, असा टोलाही त्यांनी लगावलाय.