मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळां उद्यापासून उघडणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 Jan :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने राज्याने पुन्हा शाळा उघड्यास परवागणी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा उद्या मंगळवार दि. 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत. सर्व शाळांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गेल्या तीन-चार वेळेपासून आठ-दहा दिवस शाळा सुरू आणि बंद असा प्रकार सुरू आहे. आधीच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले, आणि कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाल्याने शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर डिसेंबर महिन्यात शाळाही न पाहिलेले पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थी आले होते. परंतु अवघे पंधराच दिवस शाळेत आल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आल्या.

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहितील असा निर्णय मनपा प्रशासकांनी घेतला होता. त्यानंतर आठवी ते बारावीचे ग्रामीण भागातील वर्ग 25 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. तर शहरातील दहावी आणि बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील पहिली ते सातवीचे वर्ग उद्या मंगळवार पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे गटणे यांनी सांगितले. तर शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग कधी सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.