महाराष्ट्रNewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारत

हेडफोन दिला नाही म्हणून तरुणाचा चाकू भोकसून खून

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या आठवड्यभरापासून खून आणि हत्याचे सत्र सुरूच आहे. आजही हेडफोन दिला नाही म्हणून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर सोनवणे या तरुणाची त्याचाच मित्र शिवड्या उर्फ सुरेश शिंदे यांनी चाकू भोसकून हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर, आरोपी सुरेश आणि त्यांचे मित्र एकत्र दारू पीत बसले होते. याच वेळी आरोपी सुरेश याने ज्ञानेश्वरच्या नकळत त्याचा हेडफोन आणि मोबाईल स्वतः जवळ ठेवला.

तो परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वरने आपल्याकडे असलेला चाकू आरोपी सुरेशवर उगारला. मात्र सुरेशने हाताला झटका देत तो चाकू जमिनीवर पाडला आणि त्याच चाकूने ज्ञानेश्वरला भोसकून त्याची हत्या केली. ज्ञानेश्वरची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर पॅरोलवर सुटलेल्या आरोपी सुरेश शिंदे याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.