भारत

‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार विमानसेवा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- बाहेरील देशातील कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमासेवा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढता कोरोना प्रसार पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे.