देश विदेश

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा बरगळले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 july : पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी संपूर्ण जगात अडीच बदनाम आहे.पण सूंत जाळला तरी पीळ जात नाही अशी गत पाकिस्तानची आहे. आधी दशतवादी पाळायचे नंतर काही झाले तरी भारताला दोष द्याचा हि गटाचं ह्या देशाची झाले असून त्यांच्या पंतप्रधांनी आता बाष्कळ भाषा वापरली आहे.भारतावर नुकतेच बिनबुडाचे व निराधार आरोप केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यांच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोट हल्यासाठी भारताला दोषी ठरवले आहे. या जबरदस्त हल्ल्यामागील संपूर्ण नियोजन आणि वित्तपुरवठा भारताने केला असल्याचा दावा त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्गाने या वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

या हल्ल्याचा मास्टरमाइंड भारतीय रॉ एजंट असल्याचा दावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मोईद युसुफ यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, २३ जून रोजी झालेल्या या हल्ल्याबरोबरच अनेक सायबर हल्लेही यावेळी करण्यात आले होतेपाकिस्तानच्या लाहोरमधील जौहर शहरात २३ जून रोजी स्फोट झाला होता. यामध्ये ३ लोकांचा मृत्यू आणि १७ लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. हा हल्ला मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईद याच्या घराजवळ करण्यात आला होता. या भीषण स्फोटात सुमारे ३० किलो स्फोटके वापरली गेली. यामध्ये परदेशात बनवलेल्या वस्तूंचा वापरही केला गेला असल्याचे ते म्हणाले. या स्फोटामुळे घटनास्थळावर तीन फूट खोल व ८ फूट रुंद खड्ड तयार झाला आहे.