सिनेमा,मनोरंजन

‘या’कारणामुळे सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान झाला दुसऱ्या पत्नीपासून विभक्त!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July : अभिनेता अमीर खान ने लग्नाच्या तब्बल पंधरा वर्षानंतर घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.२००५ रोजी अमीर खान आणि किरण राव यांचे लग्न झाले होते.दोघांनी परस्पर संमतीने हा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून त्याचे दुसरे लग्न सुद्द्धा मोडले आहे.दोघांनी लिहिले, ’15 वर्षे एकत्र घालवताना आम्ही आनंदाने प्रत्येक क्षण जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक ‘नवीन अध्याय’सुरू करत आहोत जो पती-पत्नी या नात्याचा नसेल, परंतु तो को-पॅरेंट आणि एकमेकांसाठी कुटुंब म्हणून असेल. आम्ही काही काळापूर्वी विभक्त होण्याचे ठरवले आणि आता आम्ही या वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझादचे को-पॅरेंट असून आणि एकत्र त्याचे संगोपन करु.आम्ही दोघेही चित्रपट आणि आमच्या पानी फाउंडेशन व्यतिरिक्त आमच्या आवडीच्या सर्व प्रोजेक्टवर एकत्र काम करत राहू. याकाळात आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबाचे मनापासून आभार. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो. आमच्या हितचिंतकांनीसुद्धा आमच्या घटस्फोटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहावे अशी आमची अपेक्षा आहे.किरण आणि आमिर यांना एक मुलगा असून आझाद हे त्याचे नाव आहे. तो आता दहा वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. किरणला गर्भधारणेत अडचण आल्यामुळे त्यांनी सरोगसीचा निर्णय घेतला होता. 2011 मध्ये आझादचा जन्म झाला.आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ताशी झाले होते. कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनी लग्न केले होते. 18 एप्रिल 1986 रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले आणि त्यानंतर 16 वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. आमिर आणि रीना यांना मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा आहेत. दोघेही रीनासोबत राहतात.