बीड

बीड पोलीस ऍक्शन मोडमध्ये; रत्यावर फिरणाऱ्यांना मिळतोय काठ्यांचा प्रसाद

पोलिसांच्या कारवाईने कमी झाली रस्त्यावरील गर्दी

23 April :- राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊन लावला आहे. या लॉकडाऊनचा आजचा पहिला दिवस, दरम्यान बीड मध्ये पहिल्याच दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसाद दिला गेलाय. सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक आस्थापना खुल्या करण्यास परवानगी आहे. माञ ही वेळ संपल्यानंतर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलंय.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

शहरात ठिक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असून बाहेर पडलेल्या नागरिकांची चौकशी केली जातेय. यावेळी हौशीना चांगलाच प्रसाद दिला गेलाय. एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. तर नागरिकांची रस्त्यावरील गर्दी कमी होण्याचं नाव घेत नाहीय. शहरातील बशीरगंज, सुभाष रोड, माळवेस याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जातेय. पोलिसांच्या या कारवाईने रस्त्यावरील नागरिकांची गर्दी कमी झालीय.