महाराष्ट्र

१२ वर्षीय मुलाची विष प्राशन करुन आत्महत्या

मोबाईल खेळण्यावरुन झाला वाद

28 March :- मोबाईल खेळण्यावरुन दोन भावाच्या झालेल्या वादात बारा वर्षाच्या भावाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज संग्रामपुर तालुक्यातील टाकळी पंच येथे घडली. मृतकाचे नाव शैलेश परमेश्वर इंगळे असे आहे.टाकळी पंच येथे रविवार, 28 मार्च रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान मोबाईल वरुन दोघे भावात किरकोळ वाद झाला.यात शैलेश या १२ वर्षीय भावाने रागाच्या भरात विष प्राशन केले.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा

त्याला उपचारासाठी पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवचरण खोंड यांनी विनाविलंब स्वताच्या वाहनाने त्याला शेगाव येथील सईबाई रुग्णालयात हलविले.

गंभीर अवस्थेत शैलेशला सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे नेत असतांनाच शैलेशची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी शैलेशला मृत घोषीत केले. मोबाईल मुळे रागाच्या भरात १२ वर्षीय शैलेजने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने समाज मनसुन्न झाले असुन टाकळी पंच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.