महाराष्ट्र

राज्यात 10 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा- राजेश टोपे

आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचं लसीकरण पूर्ण

17 March :- एकीकडे कोरोना लसीच्या वापरावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं असताना, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर झाल्याचं ट्वीट आज प्रकाश जावडेकर यांनी केलं. त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची परिस्थिती सांगितली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. राज्यात एकूण 1880 सेंटर मंजूर झाले आहेत. आतापर्यंत 33 लाख 65 हजार 952 लोकांचं लसीकरण केलं आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील इतर आजार असलेल्या लोकांचा समावेश आहे. काल दिवसभरात 2 लाख 32 हजार 340 एवढ्या लोकांचं लसीकरण झालं आहे. आता दिवसाला 3 लाख लोकांचं लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी कोरोना लसही तेवढ्यात प्रमाणात प्राप्त होणं गरजेचं आहे.

साधारणपणे एक कोटींहून लोकांचं लसीकरण करायचं आहे. दोन कोटी 30 लाख डोस आपल्याला येत्या तीन महिन्यात आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक आहे. मी स्वत: काल केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आरोग्य सचिव राजेश भूषण यांना भेटून केली आहे.