News

सतत खंडीत होणा-या वीज पुरवठ्यामुळे किल्लेधारुरकर हैराण

किल्लेधारुर दि.(प्रतिनिधी) आधीच उन्हाळ्यामुळे होत असलेली गरमी त्यात सतत खंडीत होणारा वीजपूरवठा यामुळे किल्लेधारुर शहरातील नागरिक हैराण झाले असून वीज मंडळाने नियमीत वीज पुरवठा करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक घरी बसून आहेत. घरी थांबून टीव्ही तसेच इतर विद्यूत उपकरणांचा आनंद घेत घरातच वेळ घालवत आहेत. परंतू किल्लेधारुर शहरात दर तासाला सतत वीज खंडीत होण्याचा प्रकार सुरु आहे. या खंडीत होणा-या वीज पुरवठ्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. सततच्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात असलेल्या उष्णतेमुळे निर्माण होणा-या उकाड्यास नागरिक वैतागले आहे. यामुळे हा सततचा खंडीत होणारा वीजपुरवठा नियमीत करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.