महाराष्ट्र

पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळ मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका- संजय राठोड

संजय राठोड यांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला!

23 Feb :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर प्रसारमाधमांसमोर आले आहे. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गेल्या 15 दिवसांपासून गायब असलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहे. संजय राठोड यांनी आज पोहरादेवीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

‘पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, पण या प्रकरणमुळे वाटेल ते आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही’, असा दावा राठोड यांनी केला.

‘या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही सत्य या चौकशीतून समोर येईल, ते सर्वांनी पाहावे’, असंही राठोड म्हणाले. मी काही 15दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असंही संजय राठोड म्हणाले. संजय राठोड हे यवतमाळ येथील आपल्या घरीच होते.

आज सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही आहेत. पोहोरादेवी येथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी राठोड यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. कोरोना संसर्गामुळे गर्दी होऊ देऊ नका, अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून वारंवार केली जात होती. पण तरीही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.