महाराष्ट्र

100 वर्षात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला पाहिलाच नाही- अमृता फडणवीस

अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल

2 Feb :- युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांना सध्या ट्रोल केले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. गेल्या 100 वर्षात देशात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला आपण पाहिलाच नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, ट्विटरवरील काही युजर्सनी एक बिनतोड मुद्दा उपस्थित करत अमृता फडणवीस यांना ट्रोल केले.

भारताला स्वातंत्र्य मिळूनच 74 वर्षे झाली मग तुम्ही 100 वर्षातील चांगला अर्थसंकल्प असे कसे म्हणू शकता? यापूर्वी देशात इंग्रजांनीच चांगला बजेट सादर केला होता, असे तुम्हाला म्हणायचे आहे का?, असे प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.