महाराष्ट्र

‘या’ शब्दांत केली अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका, म्हणाले…

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली टीका

2 Feb :- केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाचा असतो, तो देशासाठीच हवा. अर्थसंकल्प निवडणुकांचा नसतो. मात्र आज जो अर्थसंकल्प सादर झाला, तो निवडणुकांचा असल्याचे जाणवते, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. उद्धव यांच्या हस्ते सोमवारी कल्याण-डोंबिवली येथे शिवसेनेत प्रवेश झाले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

त्या वेळी प्रसिद्धि माध्यमांनी उद्धव यांना केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले, मी अर्थसंकल्प पहिल्यांदा नीट वाचेन, मग प्रतिक्रिया देईन. मात्र माझ्या कानावर जे आले त्यावरून अर्थसंकल्प निवडणुकांचा असल्याचे दिसते, असा टोला उद्धव यांनी लगावला. केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाचा असतो. त्यात देशवासीयांच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा उमटल्या पाहिजेत. अर्थसंकल्प निवडणुकांचा असता कामा नये, असे ते म्हणाले.