महाराष्ट्र

‘या’ दिवशी सुरू होणार दहावी-बारावीच्या परीक्षा- वर्षा गायकवाड

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली घोषणा

21 Jan :- राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मागच्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती, त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती.

दरम्यान कोरोनामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा जानेवारी महिन्याच्या अखेर सुरू करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. पण चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.