News

शेतक-यास वाळूच्या हायवाने चिरडल्याने त्याच्या शरिराचे दोन तुकडे झाले

गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील घटना 

गेवराई , :- सकाळी शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील पुलावर एका अज्ञात वाळूच्या हायवाने रुस्तुम मते यांना चिरडले त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू होऊन त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले असल्याची घटना सोमवार ४ जानेवारी रोजी सकाळी ६.४० च्या दरम्यान  घडली.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून गावकर्‍यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.        गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते वय वर्षे (६०) हे सकाळी साडे सहाच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षसभुवन येथून अवैधरित्या वाळू घेऊन  जाणाऱ्या अज्ञात हायवाने त्यांना चिरडले यामध्ये ते जागीच ठार झाले असून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे होवून पूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अवैधरित्या चालणारी वाळू उपसा तात्काळ बंद करा व दोषींवर कारवाई करा यासाठी गावकर्‍यांनी ठिय्या आंदोलन  सुरु केले असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.