राजकारण

कंगनाबाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ

उर्मिला मातोंडकरचा कंगनाला खोचक टोमणा

29 Dece :- चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत मुंबईत परतली आहे. ती मुंबा देवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटतं आहे”, असं ट्विट कंगनानं केलं आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून उर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. उर्मिला यांनी कंगनानं मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभं राहिल्याबद्दल. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असं खोचक ट्वीट उर्मिला यांनी केलं आहे.


काही दिवसांपूर्वी कंगना आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय बोचरी टीका केली होती. तसंच मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ (POK) असंही म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर केवळ सरकारच नाही तर सामान्य मुंबईकरांचं मनही दुखावलं गेलं होतं. मुंबईतील रोष पाहता गेल्या वेळी कंगना आली होती तेव्हा तिच्यासाठी झेड सिक्युरिटी देण्यात आली होती. मात्र यावेळी तिची Z सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती.